कधीतरी संथपणे पुढे जाणारं किंवा अगदीच थबकून गेलेलं आयुष्य कधीतरी झपाट्याने पुढे जाऊ लागतं.. एवढं झपाट्याने की त्या वेगाशी जुळवून घेताना धाप लागावी अन् अशातच कधीतरी ठेच लागून आपण जायबंदी झाल्यासारखं झालं की माणसाला गहन आणि गंभीर प्रश्न पडू लागतात... आयुष्य खरंतर असंच असतं.. ते कधीच आपल्या सोईनुसार नसतं तरीही अपेक्षा संपत नाहीत... पुढे मागे अपेक्षा आटून गेल्या तरीही आशा कधीच संपत नाही... कारण बहूदा आशा संपली तर सगळंच संपल्यासारखं वाटू लागतं... त्यामुळेच आशा संपत नाही... अगदी नैराश्याच्या खोल खोल काळोखात अडकून पडलेल्या माणसातही आशेचा अंश असतो... निष्पर्ण झालेल्या झाडाला कधीतरी पालवी फुटून यावी तसं नैराश्याच्या काळोखातही आशेचे किरण कधीतरी उगवतात अन् म्हणूनच आशा आहे तोवर आपण असतो, आयुष्य असतं.. जगणं असतं.. पुढे जात राहणं असतं...
#जगणं
>>Click here to continue<<