उद्या होणाऱ्या कम्बाईन गट ब मुख्य परीक्षा 2024 साठी सर्व परीक्षार्थींना हार्दिक शुभेच्छा! 💐💐
विजयी भव:✨
विजयी भव:✨
Media is too big
VIEW IN TELEGRAM
Book - राधा
Author - समर
Author - समर
JAHIRAT-HOSTEL 2025.pdf
1.2 MB
JAHIRAT-HOSTEL 2025.pdf
https://www.sarthi-maharashtragov.in/announcement/hostel
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) तर्फे नाशिक या ठिकाणी मुलींसाठी होस्टेल फॉर्म
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) तर्फे नाशिक या ठिकाणी मुलींसाठी होस्टेल फॉर्म
www.sarthi-maharashtragov.in
मातोश्री मुलींचे वसतिगृह, नाशिक - प्रवेश जाहिरात - सन २०२५-२६ | Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development…
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी)
Group B Mains Paper 1 .pdf
8.5 MB
#MPSC
♦️आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर..
👉 पेपर क्रमांक 1 मराठी व इंग्रजी..
♦️आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर..
👉 पेपर क्रमांक 1 मराठी व इंग्रजी..
"परीक्षेत मुलीला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळवता आले म्हणून एका मुख्याध्यापक बापाने आपल्या मुलीला एवढी जबर मारहाण केली की त्यामुळे त्या मुलीचा जीव गेला." अशी एक बातमी होती. या बातमीखाली एका जणाने कॉमेंट केली. तो म्हणाला, हे मास्तर, प्राध्यापक वगैरे लोक असेच एकजात बेअक्कल असतात.
खरं म्हणजे असं सरसकट सगळ्या शिक्षक, प्राध्यापक लोकांना बेअक्कल म्हणणे चुकीचे आहे. परंतु, ही घटनाच एवढी वेदनादायक असल्याने आपण त्या कमेंटकर्त्या व्यक्तीच्या शब्दांमागच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. आणि त्याचे शब्द जरी अतिरेकी वाटत असले तरी यात थोडेसे तथ्य देखिल आहे. तेही नाकारून चालणार नाही. त्यामुळे समाजासाठी तळमळ असणारे चांगले शिक्षक, प्राध्यापक मंडळी बाजूला करून त्या कमेंटकर्त्याला अभिप्रेत असलेला जो एक "सुशिक्षित बेअक्कल" वर्ग आहे त्या वर्गाचा आपण समाचार घेऊ.
माझ्या स्वतःच्याच परिवारात (भावकीत वगैरे) बरेच प्राध्यापक, स्वतः शिक्षक असून समाज प्रबोधन करणारे कीर्तनकार, इंजिनीयर वगैरे लोक आहेत. त्यामुळे या लोकांचं वर्तन मला जवळून बघायला मिळालं. आयुष्यात काहितरी अचिव्ह (Achieve) केलेले, आपापल्या क्षेत्रात ज्यांना दिग्गज म्हणता येईल असे हे लोक. यांची गणना सुशिक्षित वर्गात केली जाते. येताजाता हे दुसऱ्यांना आपल्या जवळील ज्ञान वाटत असतात. समाजात यांना मान सन्मानही भरपूर मिळतो. कारण लोकांच्या दृष्टीने हे एक आदर्श व्यक्ती असतात. पण स्वतःच्या घरातल्या लोकांसाठी मात्र हे लोक अतिशय त्रासदायक असतात असं यांच्या बाबतीत एक निरीक्षण आहे. (यांना काही लोक - "शिकेल तेवढे हुकेल" असं म्हणत असतात. आणि हे अजिबात खोटं नाही.)
यांनी स्वतः आयुष्यात जे काही थोडेबहुत मिळवले असेल त्याची यांना खूप घमेंड असते. यांच्या देहबोलीतून आपल्या ज्ञानाचा, संपत्तीचा अहंकार पदोपदी जाणवतो. हे स्वतःला खूप थोर ज्ञानी, विद्वान वगैरे समजत असतात. पण हे काही आत्मानुभूतीतून प्रकट झालेलं वगैरे खरं ज्ञान नसतं. तर नुसती पोपटपंची असते. चार पुस्तके वाचून, घोकंपट्टी करून मिळवलेलं ज्ञान. त्याची हे मिजास दाखवत फिरत असतात.
यांना स्वतःची प्रतिष्ठा खूप महत्वाची वाटत असते. प्रत्यक्षात यांना यांच्या गल्लीत सुध्दा कोणी ओळखत नसतं. पण ते समजण्याची यांची पात्रता नसते.
हे आत्ममग्न लोक स्वतःच्याच जगात मश्गूल असतात. बाहेरच्या जगापासून पूर्णपणे अनभिज्ञ. त्यामुळे जग कुठे गेले आहे याची खबरबात या लोकांना नसते.
पोटापुरते, पोट भरण्यापुरते ज्ञान मिळाले की यांचा आणि ज्ञानाचा संबंध यांनी कायमचा तोडून टाकलेला असतो. आणि मग एकदा मिळवलेले तेच तेच ज्ञान हे लोक आयुष्यभर उगाळत बसतात. काही काळ यांच्यासमवेत आपण व्यतीत केला की यांची कुपमंडुक वृत्ती आपल्या लक्षात येते.
खरं तर माणूस दुसऱ्याच्या सहकार्या शिवाय इथे काहीच करू शकत नाही. हे वास्तव आहे. पण यांना ते मान्य नसते. अगदी स्वतःच्या बापाला सुध्दा हे कुठल्या गोष्टीचे क्रेडिट द्यायला तयार नसतात. असा स्वभाव असतो या लोकांचा. त्यामुळे सगळीकडे नुसता मी मी मी डोकावत असतो यांच्या बोलण्यातून. मी हे केलं.. मी ते केलं..
आपण कुणितरी आहोत या जाणिवेतून हे लोक स्वतःची प्रतिमा जिवापाड जपण्याचा प्रयत्न करत असतात. पण यांच्या अशा वागण्याचा यांच्या जवळच्या माणसांना खूप मनस्ताप होत असतो. खासकरून यांच्या परिवारातल्या स्त्रियांना. पण याची कुठे वाच्यता करता येत नसल्याने त्या बिचाऱ्या आतल्या आत कुढत बसतात. आणि यांचा समाजातला तथाकथित मोठेपणा सांभाळण्याचा प्रयत्न करतात.
अशा हिटलरशाही वृत्तीच्या कुटुंबप्रमुखाच्या हाताखाली राहिल्याने प्रचंड घुसमट होऊन, मनाचा कोंडमारा वगैरे होऊन मागच्या पिढीतील अनेक स्त्रिया हिस्टेरियाच्या (Hysteria) शिकार झाल्या. मनोरुग्ण झाल्या.
"माझ्या पैशांवर, मी कमावलेल्या पैशांवर तुम्ही लोक जगताय, माझ्यामुळे तुम्ही आहात, हे घर आहे" वगैरे. असं हे लोक घरातील इतर सदस्यांना वारंवार बोलून दाखवत असतात. येताजाता याची जाणीव करून देत असतात. जेणेकरून सगळ्या लोकांनी माझ्यापुढे नतमस्तक व्हावे. खाली मान घालून असावे. माझ्या आज्ञेचे पालन करावे, अशी यांची अपेक्षा असते. इतरांच्या आत्म सन्मानाची किंवा भाव भावनांची मात्र यांना मुळीच पर्वा नसते.
यश, पैसा, कीर्ती, प्रतिष्ठा वगैरे यातच हे लोक जीवनाची सार्थकता समजतात. त्यापलीकडे यांना जीवन माहिती नसते. आणि माहिती करून घेण्याची इच्छा देखिल नसते. अल्प ज्ञानामुळे यांचा स्वभाव हेकेखोर झालेला असतो. आपल्या कुटुंबात राहणाऱ्या माणसांना हे गुलामासारखी वागणूक देत असतात. स्वतःच्या (खोट्या) प्रतिष्ठेला बाधा येईल असे एखादेही कृत्य यांना चालणारे नसते. मागच्या काळात याच लोकांकडून ऑनर किलिंग सारखे प्रकार घडले. आजही कुठेकुठे घडत असतात!
खरं म्हणजे असं सरसकट सगळ्या शिक्षक, प्राध्यापक लोकांना बेअक्कल म्हणणे चुकीचे आहे. परंतु, ही घटनाच एवढी वेदनादायक असल्याने आपण त्या कमेंटकर्त्या व्यक्तीच्या शब्दांमागच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. आणि त्याचे शब्द जरी अतिरेकी वाटत असले तरी यात थोडेसे तथ्य देखिल आहे. तेही नाकारून चालणार नाही. त्यामुळे समाजासाठी तळमळ असणारे चांगले शिक्षक, प्राध्यापक मंडळी बाजूला करून त्या कमेंटकर्त्याला अभिप्रेत असलेला जो एक "सुशिक्षित बेअक्कल" वर्ग आहे त्या वर्गाचा आपण समाचार घेऊ.
माझ्या स्वतःच्याच परिवारात (भावकीत वगैरे) बरेच प्राध्यापक, स्वतः शिक्षक असून समाज प्रबोधन करणारे कीर्तनकार, इंजिनीयर वगैरे लोक आहेत. त्यामुळे या लोकांचं वर्तन मला जवळून बघायला मिळालं. आयुष्यात काहितरी अचिव्ह (Achieve) केलेले, आपापल्या क्षेत्रात ज्यांना दिग्गज म्हणता येईल असे हे लोक. यांची गणना सुशिक्षित वर्गात केली जाते. येताजाता हे दुसऱ्यांना आपल्या जवळील ज्ञान वाटत असतात. समाजात यांना मान सन्मानही भरपूर मिळतो. कारण लोकांच्या दृष्टीने हे एक आदर्श व्यक्ती असतात. पण स्वतःच्या घरातल्या लोकांसाठी मात्र हे लोक अतिशय त्रासदायक असतात असं यांच्या बाबतीत एक निरीक्षण आहे. (यांना काही लोक - "शिकेल तेवढे हुकेल" असं म्हणत असतात. आणि हे अजिबात खोटं नाही.)
यांनी स्वतः आयुष्यात जे काही थोडेबहुत मिळवले असेल त्याची यांना खूप घमेंड असते. यांच्या देहबोलीतून आपल्या ज्ञानाचा, संपत्तीचा अहंकार पदोपदी जाणवतो. हे स्वतःला खूप थोर ज्ञानी, विद्वान वगैरे समजत असतात. पण हे काही आत्मानुभूतीतून प्रकट झालेलं वगैरे खरं ज्ञान नसतं. तर नुसती पोपटपंची असते. चार पुस्तके वाचून, घोकंपट्टी करून मिळवलेलं ज्ञान. त्याची हे मिजास दाखवत फिरत असतात.
यांना स्वतःची प्रतिष्ठा खूप महत्वाची वाटत असते. प्रत्यक्षात यांना यांच्या गल्लीत सुध्दा कोणी ओळखत नसतं. पण ते समजण्याची यांची पात्रता नसते.
हे आत्ममग्न लोक स्वतःच्याच जगात मश्गूल असतात. बाहेरच्या जगापासून पूर्णपणे अनभिज्ञ. त्यामुळे जग कुठे गेले आहे याची खबरबात या लोकांना नसते.
पोटापुरते, पोट भरण्यापुरते ज्ञान मिळाले की यांचा आणि ज्ञानाचा संबंध यांनी कायमचा तोडून टाकलेला असतो. आणि मग एकदा मिळवलेले तेच तेच ज्ञान हे लोक आयुष्यभर उगाळत बसतात. काही काळ यांच्यासमवेत आपण व्यतीत केला की यांची कुपमंडुक वृत्ती आपल्या लक्षात येते.
खरं तर माणूस दुसऱ्याच्या सहकार्या शिवाय इथे काहीच करू शकत नाही. हे वास्तव आहे. पण यांना ते मान्य नसते. अगदी स्वतःच्या बापाला सुध्दा हे कुठल्या गोष्टीचे क्रेडिट द्यायला तयार नसतात. असा स्वभाव असतो या लोकांचा. त्यामुळे सगळीकडे नुसता मी मी मी डोकावत असतो यांच्या बोलण्यातून. मी हे केलं.. मी ते केलं..
आपण कुणितरी आहोत या जाणिवेतून हे लोक स्वतःची प्रतिमा जिवापाड जपण्याचा प्रयत्न करत असतात. पण यांच्या अशा वागण्याचा यांच्या जवळच्या माणसांना खूप मनस्ताप होत असतो. खासकरून यांच्या परिवारातल्या स्त्रियांना. पण याची कुठे वाच्यता करता येत नसल्याने त्या बिचाऱ्या आतल्या आत कुढत बसतात. आणि यांचा समाजातला तथाकथित मोठेपणा सांभाळण्याचा प्रयत्न करतात.
अशा हिटलरशाही वृत्तीच्या कुटुंबप्रमुखाच्या हाताखाली राहिल्याने प्रचंड घुसमट होऊन, मनाचा कोंडमारा वगैरे होऊन मागच्या पिढीतील अनेक स्त्रिया हिस्टेरियाच्या (Hysteria) शिकार झाल्या. मनोरुग्ण झाल्या.
"माझ्या पैशांवर, मी कमावलेल्या पैशांवर तुम्ही लोक जगताय, माझ्यामुळे तुम्ही आहात, हे घर आहे" वगैरे. असं हे लोक घरातील इतर सदस्यांना वारंवार बोलून दाखवत असतात. येताजाता याची जाणीव करून देत असतात. जेणेकरून सगळ्या लोकांनी माझ्यापुढे नतमस्तक व्हावे. खाली मान घालून असावे. माझ्या आज्ञेचे पालन करावे, अशी यांची अपेक्षा असते. इतरांच्या आत्म सन्मानाची किंवा भाव भावनांची मात्र यांना मुळीच पर्वा नसते.
यश, पैसा, कीर्ती, प्रतिष्ठा वगैरे यातच हे लोक जीवनाची सार्थकता समजतात. त्यापलीकडे यांना जीवन माहिती नसते. आणि माहिती करून घेण्याची इच्छा देखिल नसते. अल्प ज्ञानामुळे यांचा स्वभाव हेकेखोर झालेला असतो. आपल्या कुटुंबात राहणाऱ्या माणसांना हे गुलामासारखी वागणूक देत असतात. स्वतःच्या (खोट्या) प्रतिष्ठेला बाधा येईल असे एखादेही कृत्य यांना चालणारे नसते. मागच्या काळात याच लोकांकडून ऑनर किलिंग सारखे प्रकार घडले. आजही कुठेकुठे घडत असतात!
माणूस म्हणजे मशीन असतो यांच्यासाठी. माणसांकडून यंत्रवत व्यवहाराची अपेक्षा हे लोक करत असतात. मी अमुक तमुक झालो आहे तर आता माझ्या मुलांनी सुध्दा असंच काहितरी होऊन दाखवलं पाहिजे. नाहीतर माझे नाव खराब होईल. असं यांना वाटत असतं. ही मुलांची काळजी नसून स्वतः बद्दलची जास्त असते. पण खरं म्हणजे आपण कोण आहोत हेच यांना उमगलेले नसते.
या सृष्टीच्या विशाल अशा कालचक्रामधे आपण धुळीचा एक कण देखिल नाही आहोत हे कळायला खूप अक्कल असावी लागते. ती यांच्या ठिकाणी नसते. स्वतः बद्दल भयंकर गैरसमज करून घेऊन हे लोक जगत राहतात.
"मला शिक्षणा बद्दल तुम्ही एवढं सांगता तर मग तुम्हीच का नाही कलेक्टर झालात? मास्तर होऊन का थांबलात?" असा सवाल मरण्याच्या अगोदर त्या मुलीने या मुख्याध्यापकाला केला होता म्हणे. तर यावर तो जास्तच चिडून मारझोड करायला लागला. कारण मुलगी बोलली ते सगळं खरं होतं. खऱ्याचा राग जास्त येतो माणसाला.
मागच्या पिढीत जे मास्तर झाले, प्राध्यापक झाले तेंव्हां आताच्या एवढी तीव्र स्पर्धा नव्हती. माझ्या आजी-आजोबांच्या काळात साधे चौथी पास झाला तरी त्याला सरकारी शाळेत शिक्षक म्हणून घेतले जात असे. कारण तेवढेही कोणी शिकत नसे. "उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी". असे त्या काळातील लोक म्हणत. त्यामुळे नोकऱ्या भरपूर असायच्या पण तिला महत्व नव्हते.
आता ढीगभर पीएचडी वगैरे गोळा करून सुध्दा नोकरी मिळत नाही. कारण स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे या मुलांकडून किती अपेक्षा करायची आणि या जीवघेण्या स्पर्धेत यांना किती पळवायचं याचंही भान पालकांनी ठेवावं. आणि त्यांच्यापुढे स्वतःच्या "यशाची" टिमकी वाजवणे बंद करावे.
"थ्री इडियट" मधे तो एक मुलगा हातात गिटार घेऊन गाणं म्हणतो,-
"Give me some sunshine, give me some rain, give me another chance, I wanna grow up once again.."
हे गाणे मी जेंव्हा जेंव्हा ऐकतो तेंव्हा दरवेळी काळजात कुठेतरी कालवाकालव होते. आणि असं वाटतं की खरंच, माणसाच्या जिवापेक्षा हे यश-अपयश, स्टेटस् वगैरे यांना एवढं अवास्तव महत्त्व का दिलं जात असेल या व्यवस्थेमधे? त्याशिवाय माणसाचे काही अस्तित्व असू शकत नाही का? त्याला माणूस म्हणून जगता येणार नाही का?
आजवर कित्येक लोक इथे जन्माला आले.. मेले. राख झाली त्यांची. तेही असेच यशाच्या मागे पळाले होते. त्यांनीही कितीतरी पदव्या मिळवल्या. मान-सन्मान मिळवले. त्यांचीही शेवटी राखच बनली. इथेच या मातीत मिसळून गेली. आज त्याच मातीवर आपण पाय ठेवून उभे आहोत. उद्या भविष्यात आपल्या मातीवर असंच कुणितरी उभं राहील. आणि त्या मातीच्या कणाची साधी ओळख देखिल नसेल.
जीवनाच्या नश्वरतेची ही जाणिव ज्याच्या मनात असेल केवळ त्याचे मन या जीवना विषयी अपार करुणेने भरलेले असेल. आणि या करुणेचे, ममतेचे दर्शन एखाद्या अडाणी समजल्या गेलेल्या मेंढपाळाच्या झोपडीत अगदी सहजरित्या होऊन जाईल. पण मोठी मोठी पदके, पारितोषिके, सन्मानचिन्हे वगैरे स्वतःच्या घरात भिंतीला अडकवून त्यांचे ओंगळवाणे प्रदर्शन मांडून बसलेल्या तथाकथित विद्वान महाशयांकडे ही करुणा मिळेलच याची खात्री देता येत नाही.
त्यामुळे, एखाद्याच्या नावापुढे पदव्या वाढत गेल्या म्हणजे शहाणीव देखिल तशीच वाढली असेल असे त्याच्याबद्दल मुळीच समजू नये!
- तानाजी तुकाराम शेजूळ.
दिनांक: २८/०६/२०२५
#keep
या सृष्टीच्या विशाल अशा कालचक्रामधे आपण धुळीचा एक कण देखिल नाही आहोत हे कळायला खूप अक्कल असावी लागते. ती यांच्या ठिकाणी नसते. स्वतः बद्दल भयंकर गैरसमज करून घेऊन हे लोक जगत राहतात.
"मला शिक्षणा बद्दल तुम्ही एवढं सांगता तर मग तुम्हीच का नाही कलेक्टर झालात? मास्तर होऊन का थांबलात?" असा सवाल मरण्याच्या अगोदर त्या मुलीने या मुख्याध्यापकाला केला होता म्हणे. तर यावर तो जास्तच चिडून मारझोड करायला लागला. कारण मुलगी बोलली ते सगळं खरं होतं. खऱ्याचा राग जास्त येतो माणसाला.
मागच्या पिढीत जे मास्तर झाले, प्राध्यापक झाले तेंव्हां आताच्या एवढी तीव्र स्पर्धा नव्हती. माझ्या आजी-आजोबांच्या काळात साधे चौथी पास झाला तरी त्याला सरकारी शाळेत शिक्षक म्हणून घेतले जात असे. कारण तेवढेही कोणी शिकत नसे. "उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी". असे त्या काळातील लोक म्हणत. त्यामुळे नोकऱ्या भरपूर असायच्या पण तिला महत्व नव्हते.
आता ढीगभर पीएचडी वगैरे गोळा करून सुध्दा नोकरी मिळत नाही. कारण स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे या मुलांकडून किती अपेक्षा करायची आणि या जीवघेण्या स्पर्धेत यांना किती पळवायचं याचंही भान पालकांनी ठेवावं. आणि त्यांच्यापुढे स्वतःच्या "यशाची" टिमकी वाजवणे बंद करावे.
"थ्री इडियट" मधे तो एक मुलगा हातात गिटार घेऊन गाणं म्हणतो,-
"Give me some sunshine, give me some rain, give me another chance, I wanna grow up once again.."
हे गाणे मी जेंव्हा जेंव्हा ऐकतो तेंव्हा दरवेळी काळजात कुठेतरी कालवाकालव होते. आणि असं वाटतं की खरंच, माणसाच्या जिवापेक्षा हे यश-अपयश, स्टेटस् वगैरे यांना एवढं अवास्तव महत्त्व का दिलं जात असेल या व्यवस्थेमधे? त्याशिवाय माणसाचे काही अस्तित्व असू शकत नाही का? त्याला माणूस म्हणून जगता येणार नाही का?
आजवर कित्येक लोक इथे जन्माला आले.. मेले. राख झाली त्यांची. तेही असेच यशाच्या मागे पळाले होते. त्यांनीही कितीतरी पदव्या मिळवल्या. मान-सन्मान मिळवले. त्यांचीही शेवटी राखच बनली. इथेच या मातीत मिसळून गेली. आज त्याच मातीवर आपण पाय ठेवून उभे आहोत. उद्या भविष्यात आपल्या मातीवर असंच कुणितरी उभं राहील. आणि त्या मातीच्या कणाची साधी ओळख देखिल नसेल.
जीवनाच्या नश्वरतेची ही जाणिव ज्याच्या मनात असेल केवळ त्याचे मन या जीवना विषयी अपार करुणेने भरलेले असेल. आणि या करुणेचे, ममतेचे दर्शन एखाद्या अडाणी समजल्या गेलेल्या मेंढपाळाच्या झोपडीत अगदी सहजरित्या होऊन जाईल. पण मोठी मोठी पदके, पारितोषिके, सन्मानचिन्हे वगैरे स्वतःच्या घरात भिंतीला अडकवून त्यांचे ओंगळवाणे प्रदर्शन मांडून बसलेल्या तथाकथित विद्वान महाशयांकडे ही करुणा मिळेलच याची खात्री देता येत नाही.
त्यामुळे, एखाद्याच्या नावापुढे पदव्या वाढत गेल्या म्हणजे शहाणीव देखिल तशीच वाढली असेल असे त्याच्याबद्दल मुळीच समजू नये!
- तानाजी तुकाराम शेजूळ.
दिनांक: २८/०६/२०२५
#keep
5_6271593541487564541.pdf
14.6 MB
आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर क्रमांक 2
सामान्य अध्ययन (GS)
सामान्य अध्ययन (GS)
HTML Embed Code: